खरंच, जग किती झपाट्याने बदलत चाललय ? आम्ही नवीनच शिफ्ट झालो दुसऱ्या शहरात. नवीन बिल्डिंग, नवीन माणसे, नवीन शेजारी, सगळंच नवीन होते.
मला काही फार असा वेळ मिळत नव्हता. मी माझ्या ऑफिसच्या कामात फार व्यस्त असायचे. सकाळी गेले की रात्रीच त्यामुळे फारशी कोणाशी ओळख नव्हती. सासूबाई तश्या ऍक्टिव्ह, सिनियर सिटीझन ग्रुप जॉईन केला होता. त्यामुळे त्यांचा बराचसा वेळ छान जायचा. प्रसाद माझा नवरा टूर वर जास्त असायचा. त्यामुळे घरात आम्ही दोघीच.
लग्न होऊन तशी दोन वर्षे झाली होती तरी छान घडी बसली होती. सकाळचं सगळं आवरून मी बाहेर पडायचे आणि रात्री मी यायच्या अगोदर सगळं आवरलेलं असायचं.
अशी नकळत कामाची वाटणी झालेली होती. बिल्डिंग मध्ये बरेच असे वेगवेगळे ग्रुप होते. त्यांचा आवडी नुसार ग्रुप तयार झाले होते. कुठलाही कार्यक्रम असो रील (सध्या खूप ट्रेंड आहे) ते होणारच मग गणपतीत असो अथवा चैत्र गौरी, कुठे तरी मला हे पटत नव्हतं अस वाटायचं आपण कुठे वाहवत जात आहे ? आपली संस्कृती आपली परंपरा कुठे लुप्त होत आहे ह्याचे जरा वाईट वाटायचं.
मी काही विरुद्ध नाही ह्या सगळ्या गोष्टींच्या पण कुठे काय करावं ह्याच भान असावं.
असेच एकदा एकीने हळदीकुंकू कार्यक्रमाला बोलावलं. सासूबाई म्हणाल्या, जा तू पण, नाहीतर ओळख कशी होणार ? म्हणून मी गेले. सगळ्या छान साड्या नेसून आल्या होत्या. पण ? काही जणींच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. मला खर कौतुक वाटलं, सीमा (जिच्या घरी हळदीकुंकू होत ती) किती पुढारलेल्या विचारांची आहेस ग ! तू सवाशीण आणि इतर बायकांना पण बोलवालस हे बघून फार आनंद झाला. तर ती लगेच म्हणाली, “छे ग सगळ्यांचे नवरे धडधाकट आहेत, अग त्या साडी वर मंगळसूत्र मॅच होत नाही म्हणून नाही घातलं” हे ऐकून मला सौम धक्काच बसला ! असे नाही की त्यांनी मंगळसूत्र घातलं नव्हतं म्हणून पण आपण कुठे चाललोय हे तरी कळायला हवे होते, हे माझं मत. तुम्ही फिरायला जाता, सहलीला जाता तेंव्हा राहा की हवं तसं ! असो.. तो प्रत्येकीचा वयक्तिक प्रश्न आहे. तरी काही न बोलता बसून राहिले.
मग काय सुरू झालं रीलचा पार्ट सगळ्या आपल्या आपल्या ग्रुपनी रील करायला लागल्या. बरे गाणी पण “आज की रात” अशी सगळी. मला एकदम घुसमटायला लागलं. मी जरी त्यांच्याच वयाची असले तरी ह्या गोष्टी अजिबात पटत नव्हत्या. माझं काहीच ऑब्जेकशन नाही रील करायला. पण कुठे आणि कधी करावं हे नक्की कळायला हवे. असो…
इथे गणपती दर्शनाला येतात आणि त्याचा समोर नाचतात खरेच हे सगळं पटण्यासारखे आहे का ? मला तरी नाही पटत. आपण जर आपली संस्कृती नाही जपली तर पुढच्या पिढीला काय शिकवणार ? सगळं त्यांचे आटोपलं. मग सीमा म्हणाली, “अरे राहिलच वाण द्यायचं”, मग सगळ्यांना पटापट तिने वाण दिले. मी आपलं माझं वाण घेऊन घरी परतले. सगळा प्रकार सासूबाईना सांगितला. एक होत आमच्यात, सासू सून पेक्षा एक मैत्रीचं नात होत. त्यांनी अगदी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या आता मला माझ्या पुढच्या पिढीची चिंता करायची गरज नाही, तुझ्या मुळे आपले घर नक्की सुसंस्कृत होईल.
खरेच थोडं ह्या गोष्टी वर विचार करण्यासारखं आहे. तुम्ही पुढारलेल्या विचारांचे नक्की व्हा पण आपली संस्कृती जपून ठेवा नाहीतर ह्या गोष्टी इतिहासात जमा होतील.

— लेखन : सौ चेतना सवदी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मस्त लिहिलं आहेस चेतना 👍
पेहेराव,सण ह्यातच खरं तर आपली संस्कृती आपण जपून ठेवू शकतो. ही संस्कृती जपून रहावी म्हणून तू जे थोडक्या शब्दांत छान विचार मांडलेत त्यासाठी तुझं कौतुक. असेच छान छान लेख लिहित रहा. 👏
वाह मस्त, खरंच आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे, आपण हिंदू आहोत तर बायकांनी कुंकू हे लावायचाच हवं, जीन्स वर स्कर्ट वर शोभत नाही हे कारण नकोच, मुसलमान बायका बघा कुठल्याही समारंभात जावोत नाहीतर अजून कुठे लावतात का कुंकू, मग आपणच का आपलं सोडून द्यायचं, सगळ्या जणी म्हणतातच त्यात काय एवढं, कुंकू लावूनच आपली संस्कृती दिसते अस काही नाही, अस म्हणणाऱ्यांना काय बोलावे, पण चेतना तू छान लिहिलं आहेस
धन्यवाद श्रुती
चेतना .. छान लिहिलं आहेस असंच लिहित रहा
धन्यवाद
खरंच ! माझा सुद्धा हा अनुभव आहे. आणि आपले विचार ही तंतोतंत जुळतात. आपण संस्कृती जपली नाही तर कसे होईल?
आधुनिकतेच्या आहारी जाऊन आपण काय करतोय याचा विचार सुद्धा करत नाही याचे खूप आश्चर्य वाटते.
धन्यवाद सुनीता